नाशिक

जुलैच्या मध्यातही ग्रामीण भाग टँकरवरच

जिल्ह्यात 526 गावे-वाड्यांना पाणीपुरवठा

2.35 लाख नागरिकांची तहान 129 टँकरवर; नांदगाव, येवला, मालेगावमध्ये सर्वाधिक टंचाई

नाशिक : प्रतिनिधी
पावसाळा सुरू होऊन जुलैचा मध्य उलटला असला तरी नाशिक जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागांमध्ये पाणीटंचाईचे संकट कायम आहे. समाधानकारक पाऊस न झाल्याने प्रशासनाला अजूनही टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. 16 जुलैच्या अहवालानुसार जिल्ह्यातील 121 गावे आणि 405 वाड्या, अशा एकूण 526 ठिकाणी 129 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून, 2 लाख 35 हजार 701 नागरिकांची तहान टँकरवर भागविली जात आहे.
जिल्ह्यात नांदगाव तालुक्यात सर्वाधिक 42 गावे व 208 वाड्यांसाठी 42 टँकर सुरू आहेत. येवला तालुक्यात 95 गावे-वाड्यांसाठी 39 टँकर, मालेगावमध्ये 64 ठिकाणी 16 टँकर, सिन्नरमध्ये 75 ठिकाणी 12 टँकर, देवळ्यात 18 ठिकाणी 7 टँकर, चांदवडमध्ये 16 ठिकाणी 8 टँकर आणि बागलाणमध्ये 8 ठिकाणी 5 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. दिंडोरी, इगतपुरी, नाशिक, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, कळवण आणि निफाड तालुक्यांमध्ये सध्या टँकरची गरज नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
ग्रामीण भागात अद्याप अपेक्षित पाऊस न झाल्याने विहिरी व स्थानिक जलस्रोत पुरेसे भरलेले नाहीत. त्यामुळे पावसाळ्याच्या मध्यातही शेकडो गावांतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी प्रशासनाच्या टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे.

टँकरची सद्यस्थिती
टँकरग्रस्त गावे : 121
टँकरग्रस्त वाड्या : 405
एकूण गावे-वाड्या : 526
एकूण टँकर : 129
लाभार्थी लोकसंख्या : 2,35,701
सर्वाधिक टंचाई 
नांदगाव : 42 टँकर
येवला : 39 टँकर
मालेगाव :16 टँकर

Rural areas still dependent on tankers even in mid-July.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

अर्ध्यावरचा डाव

- अ‍ॅड. प्रतीक्षा चौधरी पावसाळ्याची सकाळ होती. सगळीकडे चिंब असं वातावरण झालेलं होतं. आज आमच्या…

20 hours ago

प्रेम म्हणजे आयुष्य… की आयुष्याचा एक भाग

- अमोल जगताप नाशिकमध्ये नुकतीच घडलेली एक हृदयद्रावक घटना संपूर्ण समाजाला अंतर्मुख करून गेली. प्रेमसंबंधातून…

20 hours ago

‘जेन झी’ला आधी समजून घ्या!

- प्रा. योगेश हांडगे आजच्या घरात, महाविद्यालयात, कार्यालयात किंवा समाजात एक पिढी सतत चर्चेत आहे-जेन…

21 hours ago

तांबटी तलावाला दीड कोटीतून नवसंजीवनी

आमदार डॉ. राहुल आहेरांंच्या पाठपुराव्याला यश; लोकार्पण, जलपूजन चांदवड : वार्ताहर तालुक्यातील वडबारे येथील तांबटी…

21 hours ago

पेपरफुटीमुक्त परीक्षा : विधेयकापासून विश्वासार्ह व्यवस्थेकडे

परीक्षा म्हणजे केवळ गुणांची स्पर्धा नसते; ती विद्यार्थ्यांच्या मेहनतीची, प्रामाणिकतेची आणि भविष्यातील संधींची खरी कसोटी…

21 hours ago

तांत्रिक चूक

फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सची कंपनी असलेल्या मेटा कंपनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…

21 hours ago