मुंबई/नवी दिल्ली : प्रतिनिधी
बंगालच्या उपसागरातील संभाव्य कमी दाब क्षेत्रामुळे येत्या आठवडाभरात ईशान्य आणि पूर्व भारतात पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभाग (आयएमडी)च्या अनुमनानुसार, या संभाव्य हवामान प्रणालीमुळे छत्तीसगड आणि लगतच्या विदर्भातील क्षेत्रात पावसाच्या सरी बरसू शकतात, उर्वरित महाराष्ट्रात मात्र आगामी काही दिवसांत पावसाची फारशी काही चिन्हे दिसत नाहीत.
बंगालच्या उपसागरावर उत्तरेकडे संभाव्य कमी दाब क्षेत्र सक्रिय होत आहे. या प्रभावाने, पुढील आठवडाभर ईशान्य भारत, पूर्व उत्तर आणि प्रदेश पश्चिम हिमालयी क्षेत्रात पावसामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे ओडिशा आणि लगतच्या क्षेत्रामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. या आठवडाभरात वायव्य भारत, पश्चिम-मध्य आणि दक्षिण द्वीपकल्पीय भारताच्या मैदानी प्रदेशात पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशात 16 ते 20 जुलै दरम्यान तुरळक ते विखुरलेल्या पावसाची शक्यता आहे. छत्तीसगडमध्येही 16 ते 17 जुलै दरम्यान हलक्या स्वरूपाचा पाऊस राहू शकेल. त्यानंतर 18 ते 20 जुलै दरम्यान मात्र छत्तीसगडमध्ये सर्वदूर जोरदार पावसाची शक्यता आहे. पूर्व मध्य प्रदेश आणि पश्चिम मध्य प्रदेशात 16 ते 18 जुलै दरम्यान तुरळक ठिकाणी मेघगर्जना होईल. यावेळी विजांचा कडकडाट तसेच आणि 40-50 किमी प्रति तास वेगाने वारे वाहू शकतात. काही भागात 60 किमी प्रति तास वेगाने सोसाट्याचा वारा राहण्याचा इशारा दिला आहे.
विदर्भात हलक्या-मध्यम पावसाची शक्यता
विदर्भात 16 ते 20 जुलै दरम्यान तुरळक ते विखुरलेल्या पावसाची शक्यता आहे. 17-18 जुलै दरम्यान विदर्भातील काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. 16-18 जुलै दरम्यान छत्तीसगडमध्येही तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. या काळात छत्तीसगडमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Showers expected in Vidarbha; the rest of Maharashtra to remain dry!
- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…
- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…
ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…
आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…
पंचवीस वर्षांपासून शेतकर्यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…