उपोषणाकडे सरकारचे दुर्लक्ष, दिल्ली हायकोर्टाकडून नोटीस
नवी दिल्ली :
थ्री इडियट चित्रपटात आमिर खानने ज्यांची भूमिका साकारली ते सोनम वांगचुक थ्री इडियट चित्रपटाच्या माध्यमातून देशाच्या घराघरांत पोहोचले आहेत. रॅमन मॅगसेसे पुरस्कार पटकावल्याने त्यांचे कार्यदेखील देशाला परिचित आहे. मात्र, देशात झालेल्या नीट पेपरफुटीच्या घटनेविरोधात शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सध्या दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर त्यांचे बेमुदत उपोषण सुरू आहे. गेल्या 18 दिवसांपासून त्यांनी अन्नत्याग केल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे. गेल्या 18 दिवसांत त्यांचे वजन आठ किलोंहून अधिक कमी झाले आहे. मात्र, सरकारने अद्याप कुठलीही दखल न घेतल्याने आता हे आंदोलन थेट कोर्टात पोहोचले आहे.
सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीची चिंता व्यक्त करत ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनीही सोनम वांगचुक यांना फोन करून उपोषण मागे घेण्याची विनंती केली. तसेच अनेकांकडून वांगचुक यांच्या प्रकतीची काळजी व्यक्त करत उपोषण मागे घेण्याची विनंती केली जात आहे. दिल्लीतील वकील राकेश कुमार सैनी यांनी वांगचुक यांनी उपोषण सोडावं म्हणून जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेत वांगचुक यांचा ’जीव वाचवण्यासाठी सरकारकडून तातडीनं दखल’ घेण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. आता, न्यायालयाने याचिकेवर सुनावणी करताना केंद्र सरकारला नोटस बजावली आहे.
सोनम वांगचुक यांच्यासाठी तातडीने वैद्यकीय उपचार, जीवनरक्षक मदत आणि आवश्यक पोषण पुरवण्याची मागणी याचिकेत करण्यात आली. त्यासोबतच सरकारने त्यांच्या आंदोलकांशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा सुरू करावी, जेव्हा एखाद्या व्यक्तीचा जीव धोक्यात असतो, तेव्हा सरकार गप्प बसू शकत नाही. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे किंवा उपोषण करणे हा नागरिकांचा अधिकार आहे, परंतु त्याचवेळी आपल्या नागरिकांचा जीव वाचवणे ही सरकारचीही जबाबदारी आहे, असेही याचिकेत म्हटले आहे.
न्यायालयाने मागितले उत्तर
दरम्यान, दाखल याचिकेवर न्यायालयाने केंद्र आणि दिल्ली सरकारकडून उत्तर मागितले असून, न्यायालयाने या प्रकरणाची तातडीने दखल घेत उद्या या प्रकरणाची सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता या सुनावणीकडे देशाचे लक्ष लागले असून, सरकार उपोषणकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाची दखल घेणार का, त्यांच्याशी चर्चा करणार का, हे पाहावे लागेल.
Wangchuk’s health has deteriorated.
- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…
- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…
ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…
आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…
पंचवीस वर्षांपासून शेतकर्यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…