महानगरपालिका आयुक्त खत्री यांच्या सूचना
नाशिक : प्रतिनिधी
राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयाच्या अनुषंगाने राज्यात एकूण 19 उपाययोजना राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी महापालिका मुख्यालय तसेच सहाही विभागीय कार्यालयांतील सर्व विभागप्रमुख, तसेच कर्मचार्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार आयुक्तांनी आपल्या कर्मचार्यांना दर सोमवारी खासगी वाहनाऐवजी सायकल किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याची सूचना केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशवासीयांना इंधन बचतीबरोबरच राष्ट्रीय साधन संपत्तीचा जपून वापर करण्याबाबत आवाहन केले आहे. त्या अनुषंगाने राज्य शासनाने विविध उपाययोजना राबविण्याचे निर्देश सर्व शासकीय यंत्रणांना देत त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषदेपाठोपाठ आता नाशिक महापालिका प्रशासनानेदेखील आवश्यक पावले उचलली आहेत. याआधी महासभा व स्थायी समितीच्या सभाही ऑनलाइन घेण्याची भूमिका महापौरांनी घेतली आहे. महापालिकेत वाहनांची संख्या कर्मचार्यांएवढीच असल्याने त्यावर इंधनाचा खर्च मोठ्या प्रमाणावर येतो. इंधनासंदर्भात पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून महापालिकेने आपल्या कर्मचार्यांना दर सोमवारी सार्वजनिक वाहतुकीद्वारे येण्याबाबत आवाहन केले आहे. ऊर्जाबचत, इंधन वापरात संयम, सार्वजनिक संसाधनांचा कार्यक्षम वापर आणि पर्यावरणपूरक जीवनशैली यावर भर देण्यात आला आहे. नाशिक महापालिका अधिकारी व कर्मचार्यांनी प्रत्येक सोमवारी कार्यालयात येण्यासाठी व परत जाण्यासाठी स्वत:च्या खासगी वाहनाचा वापर टाळून सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याची सूचना मनपा आयुक्तांनी आपल्या कर्मचार्यांना केली आहे. महापालिकेत सध्या सात हजार कर्मचार्यांपैकी जवळपास अडीच ते तीन हजार कर्मचारी निवृत्त झाले आहेत. यामुळे महापालिकेच्या कामकाजावर परिणाम होंत आहे.
राज्य शासनाचे पुढील निर्देश येईपर्यंत दर सोमवारी अधिकारी, कर्मचार्यांना सायकल किंवा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार दिलेल्या सूचनेच्या अनुषंगाने अंमलबजावणी करण्यात येत आहे.
– मनीषा खत्री, आयुक्त, मनपा
The officer will come by public transport every Monday.
पश्चिम बंगाल निवडणुकांच्या काळात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशाच्या आर्थिक स्थितीविषयी चिंता व्यक्त केली…
माय मराठीच्या अहिराणी, मावची, भिली, लेवा पाटीदार, कातोडी, सामवेदी, माडिया, गोंडी, पावरा, देहवाली, कोरकू, आंध,…
गेल्या आठवड्यात नातेवाइकाच्या लग्नाला गेलो होतो. खरेतर लग्न कसले, फक्त वैताग. जावे लागते म्हणून लोक…
सवलत पाससाठी जादा पैसे उकळल्याचा ज्येष्ठ नागरिकाचा आरोप मनमाड : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या…
एकीकडे महाग झालेले शिक्षण, त्यातच शिक्षणाचा घसरलेला दर्जा आणि झालेला बट्ट्याबोळ, त्यात भर पडत आहे…
केंद्रशासित पुद्दुचेरीसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे सुवेंदू अधिकारी, आसाममध्ये भाजपाचेच…