पावसाळ्यात घाण पाण्यामुळे पायांना चिखल्या होऊ नयेत म्हणून पाच उपाय, चप्पल-बुटांची दुर्गंधी जाईल
पावसाळा सुरू झाला की, अनेकांना एक सामान्य, पण त्रासदायक समस्या जाणवते. सतत ओले होणारे पाय, चिखल, पावसाचे पाणी आणि घर्षण यामुळे चपला किंवा सँडल पायाला लागतात. परिणामी पायावर फोड येतात, त्वचा सोलली जाते आणि काही वेळा लहान जखमाही होतात. सुरुवातीला हा त्रास किरकोळ वाटत असला, तरी दुर्लक्ष केल्यास वेदना वाढू शकतात आणि संसर्ग होण्याची शक्यतादेखील निर्माण होते.
पावसात भिजून आल्यानंतर पाय शक्य तितक्या लवकर स्वच्छ धुऊन कोरडे करावेत. बाहेरून आल्यावर फक्त पाय पुसू नका. ते स्वच्छ पाण्याने धुवा. अनेकदा लोक ओल्या पायांनीच बराच वेळ राहतात. त्यामुळे त्वचा अधिक नाजूक होते आणि घर्षणामुळे जखम होण्याचा धोका वाढतो. पायाच्या बोटांमधील भागही व्यवस्थित कोरडा करणे गरजेचे आहे.
जर पायावर फोड येण्यास सुरुवात झाली असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. फोड फोडण्याचा प्रयत्न करू नये. तो भाग स्वच्छ ठेवावा आणि आवश्यक असल्यास बँडेज लावावे. जखम झाल्यास ती कोरडी आणि स्वच्छ ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. लालसरपणा, सूज किंवा पू दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Fungal infections of the feet during the monsoon
पाक अंतर्गत अस्थिरतेकडे जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंंघन होत असल्याचा आरोप करत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची सातत्याने बदनामी…
- राजेश शिरभाते देशात वरकरणी सारे काही चांगले चांगले दिसत असले, तरी अनेक घटनांमधून राजकारणी…
एकेकाळी मानवाने अंतराळाकडे प्रगती, संशोधन आणि भविष्याच्या आशेने पाहिले होते. आज मात्र त्याच अंतराळात मानवाने…
सिडकोतील अनेक भागांत साचले पाणी सिडको : प्रतिनिधी रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे सिडको परिसरातील जनजीवन…
चिखलातील वाहनाचे स्टेअरिंग घेतले हाती नाशिक : प्रतिनिधी भाजपासाठी संकटमोचक असलेले कुंभमेळामंत्री गिरीश महाजन हे…