@ प्रतीक्षा चौधरी
—–/-/–——/ ///////
दिवसेंदिवस सोशल मीडियाचा वाढता वापर हा काही नवीन विषय नाही. दिवसाची सुरुवात आणि दिवसाचा शेवट हा ज्या साधना शिवाय होऊ शकत नाही तो म्हणजे मोबाइल. मोबाइलमधील विविध अॅप्स आणि त्याबद्दलची वाढती उत्सुकता त्यांनी नेहमीच माणसाला त्याच्या वेढ्यात ओढले. त्याचे वाढते आकर्षण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच इतकं महत्त्वाचं झालंय की, मोबाइलशिवाय कोणी एक दिवसही राहू शकत नाही.
व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम, फेसबुक यांचा फक्त तरुण पिढीतच नाही, तर लहान आणि मोठ्यांमध्येदेखील वाढलेलं उत्साहाचं प्रमाण आहे. लहान मुलं तर त्या मोबाइल शिवाय जेवण सुद्धा करत नाहीत. काहींना मोबाइल बघितल्याशिवाय चैनच पडत नाही. काही प्रमाणात सोशल मीडियाचा वापर हा चांगला केला तर तो फायद्याचादेखील आहे. पण त्याचा वाढता दैनंदिन वापर हा अतिशय हानिकारक आहे. कारण जितके त्याचा चांगला उपयोग करताहेेत तितकेच वाईटदेखील वापर करता आहेत. सोशल मीडियावरून ब्लॅकमेलिंग करणे, किडनॅपिंगचे प्रमाण वाढणे, हे प्रकार व्हायला लागले आहेत. सोशल मीडियावर रील्स बनवून, अनेक जण विविध चॅनल बनवून पैसेदेखील कमावत आहेत. आपल्या बिझनेसची अॅॅडव्हर्टाइझमेंट करत आहेत. कोणत्याही गोष्टीचा प्रमाणात वापर केला तर तो योग्य आणि अति प्रमाणात केला तर तो अयोग्य ठरत असतो. कधी जाणवतं की, या सोशल मीडियाचा वापर टाळण्याचे ठरवले तर माणसाला खूप त्रास होतो. कितीही नाही म्हटले तरी माणसाला आणि मानसिकतेला लागलेला हा एक सुरुंगच आहे, जो हळूहळू भावनिकतेला, जिव्हाळ्याला पोखरून टाकेल.
Social media is a tunnel!
Mangesh Shirole, the spirited Deputy Mayor striving for the development of Igatpuri.
- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…
Simhastha: Not merely a celebration of faith, but a blueprint for Nashik's future.
The Sacred Vessel of Spirituality: The Holy Site of Nashik