उत्तर महाराष्ट्र

बोरगावजवळ तीन शेतकरी ठार

बोरगावजवळ तीन शेतकरी ठार
नाशिक : प्रतिनिधी
भाजीपाला घेऊन जाणारी पिकअप आणि खासगी आराम बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात तीन शेतकरी ठार झाल्याची घटना काल बोरगावजवळ घडली. बोरगावहून एमएच 41 ए.यू2192 ही पिकअप भाजीपाला भरुन नाशिक बाजार समितीत जात असताना चिखली गावाजवळ खासगी आराम बस आरजे27पीबी2658 यांच्यात धडक झाली. यात तीन शेतकर्‍यांचा जागीच मृत्यू झाला.
कैलास पंडीत दळवी (25, तताणी) पंढरीनाथ मुरलीधर भोये (55,शृंगारवाडी) नारायण पवार55, घागरबुडा, ता. सुरगाणा अशी अपघातात ठार झालेल्या शेतकर्‍यांची नावे आहेत. अपघातानंतर नातेवाइक आणि ग्रामस्थांनी गर्दी केली. लक्झरी बसचा चालकाला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करीत ग्रामस्थांनी महामार्ग रोखला. त्यामुळे गर्दी झाली होती.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

17 minutes ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

24 minutes ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

30 minutes ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

36 minutes ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

41 minutes ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

56 minutes ago