बोरगावजवळ तीन शेतकरी ठार
नाशिक : प्रतिनिधी
भाजीपाला घेऊन जाणारी पिकअप आणि खासगी आराम बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात तीन शेतकरी ठार झाल्याची घटना काल बोरगावजवळ घडली. बोरगावहून एमएच 41 ए.यू2192 ही पिकअप भाजीपाला भरुन नाशिक बाजार समितीत जात असताना चिखली गावाजवळ खासगी आराम बस आरजे27पीबी2658 यांच्यात धडक झाली. यात तीन शेतकर्यांचा जागीच मृत्यू झाला.
कैलास पंडीत दळवी (25, तताणी) पंढरीनाथ मुरलीधर भोये (55,शृंगारवाडी) नारायण पवार55, घागरबुडा, ता. सुरगाणा अशी अपघातात ठार झालेल्या शेतकर्यांची नावे आहेत. अपघातानंतर नातेवाइक आणि ग्रामस्थांनी गर्दी केली. लक्झरी बसचा चालकाला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करीत ग्रामस्थांनी महामार्ग रोखला. त्यामुळे गर्दी झाली होती.
पाक अंतर्गत अस्थिरतेकडे जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंंघन होत असल्याचा आरोप करत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची सातत्याने बदनामी…
- राजेश शिरभाते देशात वरकरणी सारे काही चांगले चांगले दिसत असले, तरी अनेक घटनांमधून राजकारणी…
एकेकाळी मानवाने अंतराळाकडे प्रगती, संशोधन आणि भविष्याच्या आशेने पाहिले होते. आज मात्र त्याच अंतराळात मानवाने…
सिडकोतील अनेक भागांत साचले पाणी सिडको : प्रतिनिधी रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे सिडको परिसरातील जनजीवन…
चिखलातील वाहनाचे स्टेअरिंग घेतले हाती नाशिक : प्रतिनिधी भाजपासाठी संकटमोचक असलेले कुंभमेळामंत्री गिरीश महाजन हे…