नाशिकरोड:- नाशिक महानहगपालिकेने केलेले नियोजन आणि उन्हाळ्याची तीव्रता पाहता नारायणबापू
नगर सोसायटीच्या सभासदांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे कळकळीचे आवाहन चेअरमन
रितेश गांगुर्डे आणि संचालक मंडळाने केले आहे.
एप्रिल अणि मे या महिन्यांत पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील असून,
सोसायटीच्या वतीने तसेच नियोजन करण्यात आले आहे. पाणीटंचाई जाणवणार नाही, यासाठी प्रयत्न
करण्यात येत आहे. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन गांगुर्डे यांनी केले आहे.
घरातील पाणी भरुन झाल्यावर नळ बंद करावा, पाणी जपून आणि काटकसरीने वापरावे, कोठे पाणी वाया
जात असेल, तर सोसायटीला त्वरित कळवावे, सर्वांना पाणी मिळण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन
चेअरमन आणि संचालक मंडळाने केले आहे.
गेल्या काही महिन्यापासून पाणी पुरवठा सोसायटीने सुरळीतपणे पाणीपुरवठा केला. आता
महापालिकेकडून पाणी कमी प्रमाणात येत असल्याने सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
थकबाकीदार सभासदांनी थकबाकी त्वरित (३१ मार्च अखेर) भरावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
ओबीसी उपसमितीच्या बैठकीत निर्णय, 43 नव्या जातींच्या समावेशाचा प्रस्ताव मुंबई : राज्यातील ओबीसी समुदायासाठी एक…
नीट पेपरफुटी प्रकरण; सीबीआयकडून झाडाझडती मुंबई : नीट पेपरफुटीचा कट शिवराज मोटेगावकरने त्याच्या साथीदारांना हाताशी…
पश्चिम बंगाल निवडणुकांच्या काळात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशाच्या आर्थिक स्थितीविषयी चिंता व्यक्त केली…
माय मराठीच्या अहिराणी, मावची, भिली, लेवा पाटीदार, कातोडी, सामवेदी, माडिया, गोंडी, पावरा, देहवाली, कोरकू, आंध,…
गेल्या आठवड्यात नातेवाइकाच्या लग्नाला गेलो होतो. खरेतर लग्न कसले, फक्त वैताग. जावे लागते म्हणून लोक…
सवलत पाससाठी जादा पैसे उकळल्याचा ज्येष्ठ नागरिकाचा आरोप मनमाड : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या…